रेल्वे मंत्रालय

रेल्वे अपघातांच्या संख्येत घट

Posted On: 20 JUL 2018 6:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20  जुलै  2018

 

2013-14 वर्षाच्या तुलनेत 2017-18 या वर्षात रेल्वे अपघातांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. 2013-14 साली 118 रेल्वे अपघातांची नोंद झाली. 2017-18 या वर्षात ही संख्या 73 वर आली. या रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या. यासाठी 2009-10 साली 39,671 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्या तुलनेत 2017-18 या वर्षात ही (अस्थायी) तरतूद 101988 कोटी रुपये इतकी करण्यात आली.  यात सार्वजनिक- खाजगी भागीदारीतील प्रकल्पांचाही समावेश आहे.

रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. 

 

N.Sapre/M.Pange/P.Malandkar

 

 



(Release ID: 1539509) Visitor Counter : 70


Read this release in: English