रेल्वे मंत्रालय
कुशीनगर अपघातासंदर्भात रेल्वे मंत्र्यांचे निवेदन
Posted On:
26 APR 2018 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2018
उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर जिल्ह्यात तामकुही रोड आणि दुदाही स्थानकांदरम्यान मानवरहित रेल्वे क्रॉसिंगजवळ आज सकाळी पावणे सात वाजता झालेल्या अपघातात 13 शालेय विद्यार्थी मृत्युमुखी पडले तर सात विद्यार्थी जखमी झाले. जखमींना पदरौना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेबद्दल रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून, जखमींच्या प्रकृतीला लवकर आराम वाटावा अशी भावना व्यक्त केली आहे.
रेल्वे मंत्रालयाने मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची, गंभीर जखमींना एक लाख रुपयांची तर किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
या घटनेच्या वरिष्ठ स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उपलण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
N.Sapre/N.Chitale/D.Rane
(Release ID: 1530440)
Visitor Counter : 102